WHAT'S NEW
Building an API in 60 seconds, without any server setup
ACCESSORIES
A first glimpse at Java 9: Early access release of JDK9...
The 10 Runway Trends You’ll Be Wearing This Year
WINDOWS PHONE
Five things you may have missed over the weekend
LATEST ARTICLES
बांगलादेशला मोठा धक्का! कर्णधार शाकिब-अल-हसन विश्वचषक २०२३ मधून पडला बाहेर
बांगलादेशचा कर्णधार शाकिब-अल-हसन विश्वचषकातून बाहेर झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध फलंदाजी करताना त्याच्या बोटाला दुखापत झाली, त्यामुळे तो बांगलादेशचा शेवटचा साखळी सामना असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी लढतीला मुकणार आहे. शाकिब-अल-हसनने मॅथ्यूजविरुद्ध वेळकाढूपणा करत असल्याचे अपील केल्यानंतर पंचांनी त्याला बाद घोषित केले. मॅथ्यूजनेही शाकिबला अपील मागे घेण्याची मागणी केली, पण शाकिबने ते मान्य केले नाही. या घटनेमुळे सध्या तो खूप चर्चेत आहे. श्रीलंकाविरुद्ध झालेल्या...
“मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध”, विजय वडेट्टीवार यांची भूमिका
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच चर्चेत आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा केलेलं उपोषण. तसंच मराठा आरक्षणासाठी मराठा बांधवांचं सुरु असलेलं साखळी उपोषण आणि मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली २४ डिसेंबरपर्यंतची मुदत. छगन भुजबळ यांनी बीडमध्ये सोमवारी पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलं की आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र ओबीसींच्या आरक्षणाला...
राजगुरुनगरात मनोज जरांगेंचा हुंकार, सुनील कावळेंचं बलिदान वाया जाणार नाही, कुणबी प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही!
मराठ्याच्या आत्महत्यांना सरकार जबाबादार आहे. सरकारने आरक्षण दिले असते तर आत्महत्या झाल्या नसत्या, असे मनोज जरांगे म्हणाले. मराठा समाजातील एका बांधवाने काल आत्महत्या केली. मराठा समाजावर दु:खाचा डोंगर कोसळला. मराठा समाज कावळेंचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. त्याच्या लेकराला मराठा समाज कधीच माया कमी पडू देणार नाही. कुणबी प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही, असा हुंकार मराठा आंदोलक मनोज जरांगेनी दिला आहे. तसेच...
शरद पवार यांनी साखळी बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यांना पाठिशी घातलं? नारायण राणे यांचा खळबळजनक आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चार दिवसांपूर्वी इस्त्राईल आणि हमासच्या युद्धावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवरुन टीका केली. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटचा मुद्दा खेचला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर मोठा आरोप केला. शरद पवारांनी 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दहशतवाद्यांना पाठिशी घातलं, असा गंभीर आरोप...
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे आठ धडाकेबाज निर्णय!
शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारच्या वतीनं आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या (Shinde-Fadnavis-Pawar Government) राज्य मंत्रिमंडळाची (State Cabinet) मंत्रालयात आज बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाचे निर्णयमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार ( वित्त विभाग)महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी...
गुगलचे कर्मचारी चिंतेत! पुन्हा कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, नेमकं कारण काय?
जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या Googleने 40 ते 45 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, गुगलने आपल्या न्यूज डिव्हिजनमध्ये कर्मचारी कपात केली आहे. गुगलच्या अधिकृत प्रवक्त्याने या कर्मचारी कपातीची माहिती दिली आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने असेही म्हटले आहे की 100 हून अधिक लोक अजूनही न्यूज विभागात काम करत आहेत. गुगलचे प्रवक्त्याने सांगितले की, “न्यूज डिव्हिजन ही आमची दीर्घकालीन गुंतवणूक...
खचून जाऊ नका, लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊ नका’; विनोद पाटील यांचे मराठा आंदोलकांना कळकळीचे आवाहन
मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे, असा इशारा विनोद पाटलांनी दिला आहे मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने मुंबईत गळफास घेत आत्महत्या केल्याचा दावा, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी केला आहे. कावळे यांच्या आत्महत्येनंतर विनोद पाटील यांनी मराठा आंदोलकांना कळकळीचे आवाहन केले...
सरकार अजून किती बळी घेणार, हे थांबवा, अन्यथा महागात पडेल, मनोज जरांगे पाटलांचा सूचक इशारा
'आम्हाला समाजाचे सेवक म्हणून काम करायचं आहे. मात्र, आता प्रस्थापित लोकांमुळेच आमच्यावर ही वेळ आली असून त्यांनी जर मनावर घेतलं तर दोन तासात आरक्षण मिळेल. मात्र 'सरकारने आमच्यावर पूर्वीपासून अन्याय केला. आणखी बळीची अपेक्षा आहे का? असा सवाल उपस्थित करत 'त्यांनी थांबवलं पाहिजे, नाहीतर महागात पडेल, असा सूचक इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी दिला आहे. छत्रपती संभाजीनगरहून...